बंद

जल जिवन मिशन

  • तारीख : 30/06/2020 -

मिशन

जल जीवन मिशनचे उद्दिष्ट आहे की:

  • प्रत्येक ग्रामीण कुटुंबाला आणि सार्वजनिक संस्थांना (शाळा, अंगणवाडी, आरोग्य केंद्र, ग्रामपंचायत इमारती) फंक्शनल टॅप कनेक्शन (FHTC) द्वारे सुरक्षित, गुणवत्तापूर्ण आणि नियमित पाणीपुरवठा उपलब्ध करणे.

  • ग्रामपंचायती आणि ग्रामीण समुदायांना सक्षम करणे, जेणेकरून ते स्वतःच्या पाणीपुरवठा व्यवस्थेचे नियोजन, अंमलबजावणी, व्यवस्थापन, संचालन आणि देखभाल करू शकतील.

  • पाणी व्यवस्थापनात समाजाची सक्रिय भागीदारी, जागरुकता वाढवणे, आणि जीवनमान उंचावणे.

  • राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रम (2009-10) चे पुनर्रचना करून 30 जून 2020 पासून जल जीवन मिशन म्हणून अंमलबजावणी.

उद्दिष्टे

  • सर्व ग्रामीण कुटुंबांना FHTC देणे.

  • प्राधान्य गावे: गुणवत्ता प्रभावित क्षेत्र, दुष्काळग्रस्त, वाळवंटी भाग, SAGY अंतर्गत गावे.

  • शाळा, अंगणवाडी, आरोग्य केंद्र, जीपी इमारतींना टॅप कनेक्शन देणे.

  • टॅप कनेक्शनच्या कार्यक्षमतेचे निरीक्षण करणे.

  • दीर्घकालीन पाणीपुरवठा शाश्वततेसाठी पायाभूत सुविधा आणि निधीची तरतूद.

ठळक मुद्दे

  • दररोज प्रत्येक व्यक्तीला किमान 55 लिटर पाणी FHTC द्वारे पुरवठा करणे.

  • 50% केंद्र आणि 50% राज्य सरकारची आर्थिक भागीदारी.

  • ग्रामपंचायतीकडून 10% लोकवर्गणी, देखभाल व दुरुस्तीसाठी.

  • वैयक्तिक गाव योजना आणि प्रादेशिक पाणी पुरवठा योजनांचा समावेश.

  • टिकाऊ उपाय: बोअरवेल पुनर्भरण, पावसाचे पाणी संकलन.

  • योजनेनंतर ग्रामपाणीपुरवठा व स्वच्छता समितीकडे योजना हस्तांतर.

JJM अंतर्गत घटक

  • गावांमध्ये पाइपव्दारे पाणीपुरवठा पायाभूत सुविधा विकसित करणे.

  • पाण्याचे विश्वसनीय स्त्रोत निर्माण/वाढवणे.

  • गरजेनुसार मोठ्या प्रमाणात पाणी हस्तांतरण आणि वितरण यंत्रणा उभारणे.

  • दूषित पाण्याचे तांत्रिक उपाय.

  • रेट्रोफिटींगद्वारे जुनी योजना सुधारून FHTC पुरवणे.

  • ग्रे वॉटर व्यवस्थापन.

  • सहाय्य उपक्रम:

    • IEC (माहिती, शिक्षण, संप्रेषण)

    • HRD (मानवी संसाधन विकास)

    • प्रशिक्षण

    • जल गुणवत्ता प्रयोगशाळा

    • पाणी गुणवत्ता चाचणी व निरीक्षण

    • R&D

    • ज्ञान केंद्र

    • समाज क्षमता वाढवणे

लाभार्थी:

वरील प्रमाणे

फायदे:

पिण्याचे पाणी

अर्ज कसा करावा

वरील प्रमाणे